आठवत ते buzz वर अनेक विषयांवर झालेला कल्लोळ..
अन अधून मधून होत असलेल्या कवितेची ओळ..
आठवत भांडणांना वादांना अचानक जोर येण..
अन एकमेकांना personal chat वर समजून सांगण..
आठवत एकदा तरी भेट व्हावी म्हणून केलेला plan ..
त्यासाठी निवडून दिलेले main..
आठवत तो पुणे-मुंबई प्रवास..
एकमेकांना भेटणे हाच होता आमचा अट्टाहास..
आठवत तो उद्यान गणेश मंदिराचा परिसर..
सगळ्यांची वाट बघण्यात मारलेले फेरे चार..
आठवत ती मुंबईच्या गल्ल्यामधली सहल..
अन हसत खेळत पार केलेला सेमेंटच्या दगडांचा महल..
या सगळ्या आठवणीत मी तुम्हाला कशी विसरू..
तुम्ही एक घटना.. माझ्या मनाची रचना..
आता समजून घ्या माझ्या भावना..
हीच माझी मनोकामना..
..ऋणानुबंध..
कधीतरी कोणीतरी असाच वाटेत भेटत..
अन ते भेटलेल वाटसरू अचानक आपलस होत..
नसताच मुळी ते नात रक्तच..
ते तर असत प्रेमच अन जिव्हाळ्याचं..
कदाचित असेल ते ऋण पूर्वजन्मीचे..
बंध हे रेशीम धाग्यात बांधले जातात..
म्हणूनच ते जपायचे असतात..
असेच जपू आपण आपले हे "ऋणानुबंध"..
!!!!धन्यवाद!!!!
अर्जुन, प्राची, प्रणिता, अतुल, अमर, निवेदिता, गणेश, कल्पेश, स्नेहा, मंदार, निलेश, प्रीती
-वैशाली ओटवणेकर